कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल मेमोरियल सोसायटी, चंद्रपूरचे अध्यक्ष विनोदजी दत्तात्रेय होते. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर वन अकादमीच्या उपसंचालक अश्विनी जाधव तसेच जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरणाबाबत आपले विचार व्यक्त करत महिलांचे समाजातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. आजच्या काळात महिला शिक्षण, प्रशासन, आरोग्य, समाजकारण, उद्योग, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असून समाजाच्या प्रगतीत त्यांचे योगदान मोठे असल्याचे मान्यवरांनी सांगितले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम प्रेरणादायी ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला एस.पी.एम.एस. संस्थेचे सचिव जयंत वेलंकीवार, कोषाध्यक्ष निनाद गड्डमवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे, प्रा. योगेंद्र परिहार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती परवीन पठाण यांनी महिलांचे हक्क, महिला हिंसाचार तसेच बालकांवर होणारे अत्याचार या गंभीर विषयांबाबत जनजागृती करण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती अभियान राबविले आहे. या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांना कायदे, सुरक्षा आणि त्यांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन केले.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: